

पब्लिक म्हणते राजकारण्यांना काम करण्यावाचून काेणी रोखले होते?
मुंढे गेल्यानंतर काय केले हिशेब द्या
नागपूर,ता. १५ मे: मुंबईत केंद्रिय सेवत असणारे ४० वर्षीय श्री.अभय यांचा मे महीन्याच्या पहील्या आठवड्यात करोनाचा अहवाल निगेटीव्ह आला तत्तपूर्वी त्यांच्या पत्नीचा व लहान मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता,फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे पत्नी व मुलाचे औषध लगेच सुरु केले त्यांना ५ दिवसात आराम पडला,अभय यांना देखील तापासारखं वाटलं मात्र अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांनी करोनावरील औषधे घेण्याचे टाळले मात्र ७ मे रोजी त्यांची ऑक्सीजन पातळी ही ९५ असतानाच बुहन्नमुंबई महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी त्यांना सेवन हिल्स नावाच्या खासगी रुग्णालयात भरती केले,आज १५ मे रोजी त्यांची ऑक्सीजन पातळी ही ९९ असून उद्या त्यांना रुग्णालयातून सुटी होणार आहे,महत्वाचे म्हणजे बुहन्न मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील अनेक खासगी रुग्णालयांसोबत टाय-अप करुन आपल्या नागरिकांसाठी ‘स्वखर्चाने’ बेड्स ऑक्यूपाय करुन ठेवले आहेत!
मुंबईत करोनाबाधितांची संख्या तसेच मृत्य दर हा बराच आटोक्यात आला असून याला सर्वस्वी उत्तरदायी मनपाची प्रभावी यंत्रणा असल्याचे अभय यांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.अभय यांच्या कुटुंबियांचा अहवाल करोना पॉझिटीव्ह येताच मनपा कर्मचा-यांनी त्यांच्यासोबत सतत संपर्क साधला,वेळोवेळी मार्गदर्शन केले,औषधे घरपोच पोहोचवली,त्वरीत औषधोपचाराला सुरवात झाली असल्याचे अभय सांगतात.
विशेष म्हणजे अभय यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यासाठी रुग्णवाहिका देखील मुंबई मनपानेच पुरविली असून रुग्णालयात गेल्यानंतर त्यांचे पैश्यांचे पाकीत व अंगावरील कपडे हे देखील मनपा कर्मचा-यांनी त्यांच्या घरी पोहोचवून दिले!७ मे पासून आज १५ मे पर्यंत एक नवा पैसा अभय यांना उपचारावर खर्च करावा लागला नसून,अतिशय उत्तम हवेशीर आणि आल्हादायक रुम्स,दूध,नाश्ता,जेवण,औषधे यांच्यासह ५ रेमडिसिव्हिर इंजेक्शन्सचा खर्च मुंबई मनपाने उचलला.डॉक्टर्स सतत राऊंडवर असतात,परिचारिकांचा ऑक्सीजन लेवलवर सतत डोळा असतो.
हे सर्व घडले मुंबई मनपाचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या शिस्तशीर कारभारामुळे.अभय यांचे हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे,मुंबईत प्रत्येक करोना बाधिताला योग्यवेळी योग्य उपचार मिळावा यासाठी बुहन्न मुंबई मनपाची संपूर्ण चमू ज्याप्रमाणे कार्य करीत आहे ते कौतूकास्पद असल्याचे अभय सांगतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे चहल यांच्यावर मुंबईतील करोना आटोक्यात आणण्यासाठी जवाबदारी सोपवली ती बघता मुख्यमंत्र्यांचा विश्वास चहल यांनी सार्थ ठरवला,एवढंच नव्हे तर मुंबईच्या रस्त्यांवर विहीरी एवढे खड्डे असताना आणि मुंबईकर बीएमसीला पाच वर्षे मनसोक्त शिव्याशाप देत असताना देखील मुंबई मनपाच्या निवडणूकीत पुन्हा शिवसेनेलाच का मत देते?याचे उत्तर अश्या कारभारात दडले आहे.
विदर्भ तर मुख्यमंत्र्यांचे आजोळ असल्याचे नागपूरच्या पहील्याच अधिवेशनाप्रसंगी पत्र-परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते,ते विदर्भाचे नातू असल्याचा सार्थ अभिमान देखील त्यांनी व्यक्त केला होता मग,आपल्याच आजोळमध्ये एवढ्या भयंकर महामारीच्या काळात ते पराकोटीचा गलथान कारभार कसे सहन करु शकतात?असा प्रश्न आता सामान्य नागपूरकर उपस्थित करीत आहे.
राधाकृष्णन.बी.सारखे अतिशय निष्क्रिय मनपा आयुक्त जे आपल्या मनपा मुख्यालयाची दारे आम जनतेसाठी तीन महीन्यांपासून बंद करुन बसले व ज्यांनी त्यांच्या बंगल्यासमोरचा मुख्य रस्ताच पोलीसी पहारा लाऊन बंद करुन ठेवला आहे,ज्यांना स्वत:च्या जीवाची एवढी भिती आहे,असे आयुक्त नागपूरकरांचे काय प्राण वाचवणार?असा प्रश्न नागपूरकर आता मुख्यमंत्र्यांना विचारतात आहे.हेच आहे का तुमचे आजोळवरचे प्रेम!

नागपूर मनपाची अशी आहे गलथान रुग्णसेवा-
पुष्पा डबले वय वर्षे ६० राहणार बेसा बेलतरोडी जगन्नाथ नगर.यांना करोना संसर्गामुळे ऐन गणेश चतुर्थी रोजी ३० एप्रिलला मनपाच्या इमामवाड्यातील कोविड केअर केंद्रात भरती केले.तीन दिवसात त्यांचे ऑक्सीजन ड्रॉप होत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये भरती करा असा निरोप पुष्पा यांच्या मुलीला इमामवाडा कोविड केंद्रातर्फे देण्यात आला(स्वत: मात्र कोणत्याही शासकीय किवा खासगी रुग्णालयात भरती केले नाही!ही जवाबदारी नागपूर मनपाची नाही का?)हे इमामवाडाचे कोविड केंद्र एवढ्या घाणेरड्या अवस्थेत आहे आणि एवढे मच्छर आहेत की तिथे तिथे करोना रुग्ण हा आणखी आजारी पडेल असे पुष्पा यांची मुलगी निशा सांगते.
मे महिन्याचा पहीला आठवडा हा नागपूर शहरात करोनाचा प्रादुर्भाव उच्चांकावर असल्यामुळे कुठेही आईसाठी आयसीयू बेडची व्यवस्था झाली नाही,खूप प्रयत्नांती रामदासपेठ येथील आयुष्यमान रुग्णालयात एक बेड खाली असल्याचे या रुग्णालयाचे इंजार्च डॉ.मुरली यांनी निशा यांना सांगितले.
मनपातर्फे वयोवृद्ध व गंभीर आजारी असणा-या पुष्पा यांना इतर रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली नाही,आयुष्यमान रुग्णालयात निशा यांच्या बहीणीने रुग्णवाहिकेचेही पैसे भरले.या खासगी रुग्णालयाने कोणती गाडी पाठवावी?तर ओमनी व्हॅन पाठवली,शाळेची बस!ती देखील अतिशय खटारा होती.फक्त एक ड्रायव्हर होता.आईला अतिशय त्रासात या व्हॅनमध्ये आयुष्मानला आणले असताना पाऊन तास त्यांना व्हॅनमध्येच ठेवण्यात आले.पुष्पा यांची मुलगी वारंवार रुग्णालयाला फोनवर विनंती करुन आईला लवकरात लवकर भरती करुन घ्या व उपचाराची सुरवात करा असे म्हणत होत्या.
या रुग्णालयाने तरी देखील भर उन्हात पाऊन तास या वयोवृद्ध व गंभीर आजारी रुग्णाला ताटकळत व्हॅनमध्येच ठेवले.यानंतर डॉ.मुरली यांनी सांगितले ’त्यांच्याकडे बेड उपलब्ध नाही!’यावर पुष्पा यांच्या मुलीने आक्ष्ेप नोंदवत तुम्हीच फोनवर बेड उपलब्ध असल्याचे सांगितले मग आता तुम्हाला रुग्णाला भरती करावेच लागेल,अशी विनंती केली.यावर एक लाख रुपये त्वरीत काऊंटरवर जमा करण्यास सांगण्यात आले.
पैसे भरल्यानंतर एक वॉर्ड बॉय व्हॅनजवळ आला आणि ‘आंटी उठकर स्ट्रेचरपर बैठो म्हणाला!आधीच व्हॅनमध्ये जवळपास एका तासाचा वेळ वाया गेल्याने व दगदगीमुळे आईचे ऑक्सीजन लेवल कमी झाले होते,त्यांना उभे ही राहता येत नव्हते मात्र वॉर्ड बॉय त्यांनाच उभे राहून स्ट्रेचरवर झोपा म्हणत होता.यामुळे पुष्पा यांचे ऑक्सीजन लेवल ८० पर्यंत खाली आले.
यानंतर रुग्णालयातून अर्धा तासात फोन आला प्लाझमा लागेल!फार्मेसीची भरगच्च बिले देखील सोबत पाठवली.डॉ.मुरली यांना पुष्पा यांच्या मुलीने आईला काहीही लागल्यास संपर्क कोणाला करावा असे विचारले असता,रुग्णालयातूनच तुम्हाला फोन येतील असे सांगून आईसाठी कपडे आणून द्या,असे फर्मान सोडले.लगेच पुष्पा यांच्या मुलीने दोन नवे गाऊन आईसाठी रुग्णालयाच्या वॉर्ड बॉयकडून पाठवले मात्र….आई काल अक्ष्य्य तृतीयेला घरी आली तेव्हा देखील त्यांच्या अंगावर इमामवाडा कोविड केअर केंद्रात जी साडी नेसली होती तीच होती…..!नवे काेरे गाऊन गायब झाले होते,किंबहूना ते आईपर्यंत पोहोचलेच नाहीत.याचप्रमाणे सेब,फळ,दालिया,घरचा डबा काहीच आईकडे ती घरी येईपर्यंत पोहोचले नाही.
आईने काल अक्ष् य्य तृतीयेला एवढ्या दिवसांनतर घरी पहील्यांदा चहा प्यायला.या रुग्णालयाने दोन वेळच्या जेवणाचे पैसे देखील पॅकेजमध्ये ॲड केले होते मात्र आईला सुटी होईपर्यंत मिळाला फक्त भात तो ही नारळ पाणी घातलेला!ते ही दिवसातून फक्त एकदा दूपारी बारा वाजता! एका वॉर्ड बॉयला वारंवार पैसे देऊन आईसोबत एक मिनिटांसाठी बोलणे करुन घेत असल्यामुळे खरी परिस्थिती कळायची.
या रुग्णालयाच्या डॉक्टरशी पुष्पा यांच्या मुलीने याबाबत बोलेले असता,तुमच्या रुग्णाची संपूर्ण काळजी घेतली जात आहे अशी बोळवण केली गेली.कधीही पुष्पा यांच्या मुलींना त्यांना भेटू दिले नाही.विशेष म्हणजे आयुष्यमान रुग्णालयाच्या खाली एकूण किती ‘बांऊसर’उभे असतात?८ ते १० बाऊंरर्स!ते कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकाला वर जाऊ देत नाहीत….!
दररोज रुग्णालयाकडून फक्त पैश्यांसाठीच फोन आलेत.दुस-यांदा प्लाझमा मागितला.५० हजारांचे इंजेक्शनही रुग्णालयानेच लावले,बिलात हे पैसे जोडले.वार्ड बॉय सांगायचा ऑक्सीजन लेवल ९० आहे तर आयुष्यमानचे डॉ.जावेद सांगायचे ऑक्सीजन लेवर ८३ आहे!कधी सीटी स्कॅन,कधी वेंटिलेटर,कधी आयसीयू….!
आम्हाला फक्त एकदा डोळ्याने आपल्या रुग्णाला बघू द्या,ही विनंती देखील या रुग्णालयाने धुडकावून लावली,तुम्हाला ट्रीटमेंटवर डाऊट आहे का?असा उमर्टपणा करुन डॉ.जावेद म्हणाले ’लेके जाओ अपने पेशंट को?आई आयसीयूमध्ये,शहरात इतर कुठेही बेड उपलब्ध नाही,त्यामुळे पांढ-या कोटमधील हे ‘देवदूत‘करीत असलेला मानसिक छळ मुकाट्यायने सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता….!
कहर तर तेव्हा झाला आईला आयसीयूमधून काढून जनरल वॉर्डात आणून ठेवले आणि आईचा आयसीयू बेड इतर कोणाला तरी दिला.आई जनरल वॉर्डात असल्याचे रुग्णालयाने कळवले देखील नाही,बहीण शेवटी दोन चुलत भावांना घेऊन रुग्णालयात वर गेली असता आई मलकट साडीमध्ये हाडांचा सापळा होऊन जनरल वॉर्डात रडत बसली होती……!
आईचे रडणे थांबत नसल्याने बहीणीने आईला घरी नेण्याचा निर्धार केला,काल अक्ष् य्य तृतीयेला रुग्णालयाचे तीन लाख रुपये बिल भरुन त्याच अवस्थेत आईला घरी आणले,त्या अजूनही ऑक्सीजनवर आहेत.एक नर्स त्यांच्या देखरेखीसाठी हायर केली आहे.
दूर्देवाने बाबा अरविंद डबले हे देखील न्यूरॉनमध्ये करोना संसर्गामुळे भरती होते.इतकंच की बाबांना या रुग्णालयात वेळेवर जेवण मिळत होते आणि बाबा हे मोबाईलवर कुटुंबियांशी बोलू शकत होते…कालच बाबा देखील सुटी होऊन घरी आलेत…पण….त्यांचा संपूर्ण भविष्य निर्वाह निधी आणि दोन्ही मुलींचे दागिने या दोन्ही खासगी रुग्णालयांची बिले भरण्यात कायमचे खर्च झाले….!
या रुग्णालयात निशा यांना आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कुठेही दर-फलक दिसला नाही किवा…मनपा अति.आयुक्त जलज शर्मा यांनी नियुक्त केलेला ऑडीटर डोळ्याने एकदाही दिसला नाही…दिसले ते फक्त ‘बाऊंसर्स’……!
माननीय न्यायालयाने एक ‘समिती’ नेमली आहे हे फक्त ऐकून आहे,त्या समितीची कार्यपद्धती,फोन क्रमांक,तक्रार करण्याची पद्धत काहीही या सर्वसामान्य रुग्णांच्या कुटुंबियांना अजून तरी माहिती नाही…..!
निशा हेच सांगते नागपूर शहराच्या खासगी रुग्णालयांना नेमके कोणापासून सुरक्ष्ा पाहीजे?पारदर्शी कारभार असता तर कशाला बाऊंसर्स ठेवले असते?पोलिसांची सुरक्ष्ा का घेत नाहीत……..!
तरीही मनपा पाठ थोपटते ’मुंबई-पुण्याच्या तुलनेत नागपूरची आघाडी!’
आरोग्य यंत्रणा बळकटीकरणात नागपूरने मुंबई,पुणे शहरालाही मागे टाकले.दहा लाख लोकसंख्येमागे असणारी सर्वप्रकारच्या बेड्सची संख्या इतर शहरांपेक्ष्ा सर्वाधिक असून यामध्ये राज्यात अव्वल क्रमांक पटकावला!इमामवाडात मच्छर आणि अतिशय गलिच्छ खोलीत असलेलेयासारखे बेड्स,हीच मनपाची ‘खरी आकडेवारी’आहे,असे आता बोलले जात आहे.५० लाख लोकसंख्या असणा-या नागपूर शहरात ऑक्सीजन नसलेले बेड्सची संख्या १६ हजार ६३२ आहे,ऑक्सीजन उपलब्धता असलेल्या बेड्सीच संख्या ९ हजार ९४४ आहे,आयसीयू बेड्सची संख्या २ हजार ८०८ आहे.आयसीयू व्हेंटिलेटर बेड्सची संख्या ९९६ आहे!
सध्या नागपूर जिल्हयात प्रति दक्ष् लक्ष् लोकसंख्येमागे ३ हजार ६१६ बेड्स आहेत.यामध्ये प्रति दश लक्ष् लोसंख्येमागे ऑक्सीजन बेड्स २ हजार १६२ आहे.आयसीयू बेड्स ६१० तर आयसीयू व्हेंटिलेटर बेड्स २१७ आहेत.ही संख्या इतर जिलह्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे,अशी माहिती मनपाचे अति.आयुक्त जलज शर्मा अभिमानाने देतात,याचा अर्थ ही संख्या नागपूर मनपासाठी भूषणावह बाब ठरते!
मुंढेच्या काळात ही फक्त ६९ चाचणी केंद्रेच!
येत्या सहा महिन्यात तरी सर्वांचे लसीकरण होऊन करोनाचा प्रादुर्भाव कमी होणार नाही मात्र आज ही मनपाने आरटीपीसीआर केंद्रांमध्ये कोणतीही वाढ केली नाही.गेल्या वर्षी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात जेवढी केंद्रे होती तेवढीच ६९ केंद्रे आहेत.तिसरी लाट येणार असेल तर किमान ५०० तरी आरटीपीसीआर चाचणी केंद्रे या शहरात उपलब्ध असायला हवी मात्र सध्या महापौरांपासून तर केंद्रिय मंत्र्यांपर्यंत सर्वांना आम्ही करोना रोखण्यासाठी खूप काही करीत आहोत हे दाखवण्याचा सोस चढला असल्याची टिका समाज माध्यामात उमटली आहे.
मुंढे गेल्यावर गेल्या ९ महिन्यांपासून तुम्हाला ऑक्सीजन,रेमडिसिव्हिर उत्पादन,बेड्स,कोविड केंद्रे यावर काम करण्यासाठी कोणी रोखले होते?असा परखड सवाल करीत लाखो रुग्ण दहन घाटांवर पोहोचल्यानंतर आता आम्ही काही तरी करुन राहीलो आहोत,ही धूळफेक दररोज सुरु असल्याची खरमरीत टिका राजकारण्यांवर होत आहे.
का नाही मनपा आरटीपीसीआर केंद्रावरच औषधांची किट अहवाल पॉझिटीव्ह आल्याबरोबर रुग्णाच्या सुपुर्द करीत?यामुळे लवकर उपचार होऊन रुग्णाला क्रिटिकल होऊन खासगी किवा शासकीय रुग्णालयात भरती होण्याची वेळच येणार नाही.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप आमदार प्रवीण दटके यांनी करोनासाठी एक-एक कोटींचे धनादेश नव्हे तर फक्त ‘पत्र’ तसेही महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सुपुर्द करुन फोटो छापून आणले आहेतच त्याच पैशांनी तुम्हाला लसी मिळत नसेल तर किमान तिसरी लाट येण्यापूर्वी,लहान बालकांवर करोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी,त्यांचे पालक आक्रमक होऊन रस्त्यावर येण्यापूर्वी,राजकारण्यांचे पुतळे जाळ्यापूर्वी,वारंवार लॉकडाऊन वाढवून सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडल्यामुळे आधीच खिसे रिकामे असताना खासगी रुग्णालयांचे भरमसाठ बिले कुटुंबियांच्या माथी मारण्यापूर्वी मनपा प्रशासनाला,जिल्हाधिकारी कार्यालयाला व समस्त राजकारणी जमातीला नागपूरकर नागरिकांचा हा इशारा आहे….सुधरुन जा,काळजीपूर्वक तिस-या लाटेची आरोग्य व्यवस्था सुधारुन ठेवा.
या शहराने दोनच महिन्यात दुस-या लाटेत आपला बाप,आपली आई,आपला मुलगा,आपली मुलगी,कोणाचा नवरा तर कोणाची पत्नी कायमची गमावली आहे,तिस-या लाटेत जर खरोखर लहान मुले संक्रमित झाली तर…या शहरातला कोणताही पालक वर्ग ही त्रासदी सहन करुन शकणार नाही….आजचे समस्त राजकाण्यांचे फोटो सेशन हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यासारखे घडू नये अशी अपेक्ष्ा व्यक्त केली जात आहे.
ऐन करोनाच्या त्रासदीमध्ये २१ एप्रिल रोजी करोनाची लाट ही गोव्यातही सर्व काही उधवस्त करीत असताना गोव्याचे मुख्यमंत्री अरविंद सावंत यांनी देशातील सर्व भाषेच्या प्रचार व प्रसार माध्यमांमध्ये मोठी जाहीरात प्रसिद्ध केली होती ‘आता बदल दिसतोय…गोवा घडतोय’मात्र गेल्या दोन दिवसांपासून गोव्याच्या शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन अभावी ८३ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला,यावर सावंत यांनी अत्यंंत बेजवाबदारपणे पत्र परिषदेत उत्तर देत ‘ऑक्सीजनचा ट्रक नाक्यावर अडविण्यात आल्याने वेळेवर रुग्णांना ऑक्सीजन मिळू शकले नाही’असे उत्तर दिले,एवढंच नव्हे तर गोव्याच्या पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत चक्क पत्र परिषद सोडून उठून गेलेत.
हा…आणि असाच बदल नागपूरात मनपा सत्ताधारी आणि राजकारणी घडवू बघत असतील तर….त्याचे परिणाम भाेगण्यास त्यांनी तयार रहावे,असा इशारा सोशल मिडीयावर त्यांना नेटीझन्स देत आहेत.
पुण्यात सीरममध्ये फक्त एका दिवसात ऑक्सीजन प्लान्ट उभारण्यात आला व अवघ्या दहा दिवसात उत्पादन सुरु ही झाले, जे पुणे,मुंबईला जमले ते नागपूरला जमतं का?तरीही आम्ही पुणे,मुंबईच्या पुढे अशी शेखी नागपूर मनपा कशी मिरवू शकते?असा प्रश्न जनताच आता विचारत आहे.
बातमीतील श्री.अभय व पुष्पा डबले ही दोन्ही उदहारणे शेवटी हेच अधोरेखित करतेय……कुठे बृहन्न मुंबई महानगरपालिका कुठे दळभद्री राजकारणात अडकलेली नागपूर महानगरपापिलका…….!




आमचे चॅनल subscribe करा
