
नागपूर,५ ऑगस्ट: राज्यात महिला अल्पवयीन मुलांवर वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले.
महामंत्री अश्विनीताई जिचकार, संध्या गोतमारे, राज्य महिला आघाडीच्या सरचिटणीस शिवानी दानी यांचे संयुक्त नेतृत्वात हे धरणे-आंदोलन पार पडले. यावेळी उपस्थित ५०० हून अधिक महिलांनी राज्य सरकार, गृहमंत्री, ऊर्जावान मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, नागपुरातील गुन्हेगारांचे प्रमाण वाढले म्हणजे कायदा काय आहे याविषयी त्यांना माहिती नाही, बलात्काराच्या घटना, तरुण महिलांवर अत्याचार, अल्पवयीन मुलींवर दररोज वाढ झाली आहे. राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे. निर्घृण अत्याचार व गुन्हेगारी थांबवा, अन्यथा शहरातील सर्व पोलिस ठाण्यात आंदोलन करतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. .या प्रसंगी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या नेतृत्वात महिलांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना देण्यात आले. या निवदेनात राज्य सरकारने महिलांवरील अत्याचार त्वरीत थांबवावेत अशी मागणी केली आहे.
या धरणे आंदोलनात दिव्या धुर्डे, निताताई ठाकरे, वनिता ताई कानडे, सिमा ढोमेणे, अनुसूया गुप्ता, संध्या ठाकरे, काकी गुजर, संगीता पडली, वंदना शर्मा, पूजा तिवारी, अनसूया गुप्ता, वर्षा चौधरी, मनीषा काशीकर, गीता पारडीकर, रेखा नीमजे, कल्पना पजारे, वंदना यंगटवार
श्रद्धा पाठक, प्रगती पाटील, सना खान, सरचिटणीस माया पाटील, प्रतिभा गावडी, शुभांगी गायधने, अध्यापन अध्यक्षा वंदना मुडे, (नगरसेवक) अर्चना मुडे, ललिता राऊत, अनिता गुप्ता, छाया कराडकर, सुलोचना झेड ताई, (माझी सरपंच) स्वाती उईके, लील्ते दुधानकर, सरपंच सुनंदा नैताब, सरपंच डोकरमारे ताई, सुनंदा नागपुरे, संध्या दुधाणकर, निकिता भोयर, राऊत ताई, नागोसे ताई, गावडी ताई, अरुणा हजारे, रेणुका कामबरी नगर सेविका, माधुरी अंगडे, कल्पना महावले. आदी महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

आमचे चॅनल subscribe करा