फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनागपूरसह विदर्भात ठिकठिकाणी नागपूर कराराची होळी

नागपूरसह विदर्भात ठिकठिकाणी नागपूर कराराची होळी

Advertisements

नागपूर,ता. २८ सप्टेंबर: ‘नागपूर कराराचा निषेध असो’, ‘स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, आमचे राज्य विदर्भ राज्य’, अशा घोषणा देत विदर्भवादी
कार्यकर्त्यांनी नागपूरसह विदर्भात ठिकठिकाणी सोमवारी नागपूर कराराची होळी केली.

तत्कालीन राज्यकर्ते आणि विदर्भातील काही मान्यवरांनी महाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी २८ सप्टेंबर १९५३ रोजी ‘नागपूर करार’ केला. नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन वगळता करारातील अकरा कलमांपैकी अन्य कलमांचे पालन झालेले नाही. सरकारी नोकरीसह निधी देण्यास आतापर्यंतचे सर्व राज्यकर्ते उदासीन आहे. नागपूर कराराने विदर्भाला गुलाम केले. स्वातंत्र्य हिरावून घेतले. महाराष्ट्रवाद्यांनी शोषण करून पश्चिम महाराष्ट्र समृद्ध केला असल्याची टीका समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केली. यावेळी गणेश शर्मा, सुयोग निलदावार, विष्णू आष्टीकर, नितीन अवस्थी, सुनीता येळणे, जे. एस. ख्वाजा, रवींद्र भामोडे, प्रीती दीडमुठे, ज्योती खांडेकर, प्रशांत मुळे, गुलाबराव धांडे, तात्यासाहेब मत्ते, रामेश्वर मोहबे, शोभा येवले, नौशाद हुसेन, राजेंद्र सतई, नरेश निमजे, अण्णाजी राजेधर, राजेश बंडे, जीवन रामटेके, रामभाऊ कावडकर, रजनी शुक्ला, अशोक नेवले, जया चातूरकर, शुभम पौनीकर, चंद्रशेखर बदकुले, विभा शुक्ला, राम आखरे आदी उपस्थित होते.

काटोलमध्येही होळी-

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात समितीच्या कोर कमेटीचे सदस्य सुनील वडस्कर व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऋषभ वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कराराची होळी करून सरकारचा निषेध केला. यावेळी बोलताना वडस्कर यांनीही राज्य व केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. आंदोलनात विठ्ठलराव काकडे, धीरज मांदळे, प्रवीण राऊत, नीलेश पेठे, मनोहरराव गोलाईत, संजय उपासे, बाबाराव वाघमारे, गिरीश शेंडे, चेतन उमाठे, पुखराज रेवतकर, ऋषिकेश सुरजुसे, धनराज तुमडाम, दिलीप सुतोने आदी सहभागी झाले होते.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारासह विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातील आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शंभरहून अधिक ठिकाणी नागपूर कराराची होळी केल्याचा दावा समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला. विदर्भाच्या नावावर २०१४ साली मते घेणाऱ्या भाजपला गेल्यावर्षी वैदर्भीय मतदारांनी जागा दाखवली. भाजपचा ठराव व नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विचार करून केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन वेगळे राज्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या