
करोनाची लागण झालेल्या १३ रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यातील १० रुग्ण मुंबईतील होते तर पुणे, पनवेल आणि विरार येथील प्रत्येकी एक रुग्ण होता. मृतांत ९ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. एकूण १३ मृतांपैकी ६ जण ६० वर्षांवरील, ५ रुग्ण ४० ते ६० वर्षे या वयोगटातील तर दोन रुग्ण ४० वर्षांच्या आतील होते. १३ पैकी ११ रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा आजारांनी ग्रासलेले होते, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
मुंबई- १३२
बुलडाणा- २
कल्याण-डोंबिवली- २
मिरा भाईंदर- १७
नागपूर – ६
नाशिक- १
नवी मुंबई- १
पुणे- ३८
पिंपरी चिंचवड- ३
रत्नागिरी- १
ठाणे- २
वसई विरार- १
अन्य राज्यातून आलेला- १
दिवसभरातील एकूण नवे रुग्ण- २१०
राज्यातील एकूण करोनाबाधीत- १५७४
राज्यात करोनामुळे आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला आहे.
१८८ रुग्ण करोनामुक्त
राज्यातील विविध प्रयोगशाळांत आतापर्यंत ३३ हजार ९३ रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले असून त्यातील ३० हजार ४७७ रुग्णांचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह तर १ हजार ५४४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ करोनाबाधीत रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी घरी परतले आहेत. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ४ हजार ७३८ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
