राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी- चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत; तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशिममधील आहे.
मुंबई – ५२६ (मृत्यू ३४)
पुणे (शहर व ग्रामीण भाग) १४१ (मृत्यू ०५)
सांगली – २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा – ८५ (मृत्यू ०९)
नागपूर – १७
अहमदनगर- २३
यवतमाळ – ४
उस्मानाबाद- ३
लातूर – ८
औरंगाबाद- १० ( मृत्यू ०१)
बुलढाणा- ५ ( मृत्यू ०१)
सातारा – ५
जळगाव- २ ( मृत्यू ०१)
कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक प्रत्येकी – २
सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशीम, अमरावती – (मृत्यू १),
हिंगोली, जालना – प्रत्येकी १
इतर राज्य – २
एकूण- ८६८ त्यापैकी ७० जणांना घरी सोडले. तर ५२ जणांचा मृत्यू

आमचे चॅनल subscribe करा