Homeनागपूर न्यूजभाजपने सत्ता येताच आश्वासनाकडे फिरविली पाठ: डॉ. अमोल कोल्हे

भाजपने सत्ता येताच आश्वासनाकडे फिरविली पाठ: डॉ. अमोल कोल्हे

Advertisements

नागपूर: सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले. यावर विश्वास दर्शवत वैदर्भीयांनी ४२ आमदार निवडून दिले. भाजपने सत्ता येताच आश्वासनाकडे पाठ फिरविली. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देण्यापलीकडे हे सरकार काहीही करू शकलेले नाही, असा हल्ला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर चढवला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त दक्षिण व पूर्व नागपूरमध्ये दोन आणि काटोलमध्ये एक सभा झाली. कधीकाळी ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,’ असा प्रश्न विचारणाऱ्यांनी पाच वर्षे सत्तेत असूनही विदर्भाचा विकास केला नाही. तरुणांना रोजगार मिळेल, असा एकही नवीन प्रकल्प आणला नाही. नवे सिंचन प्रकल्प नाही व एकही पूर्ण केला नाही. कायदा व सुव्यवस्थेची स्थितीत उपराजधानीत गंभीर आहे. गुन्हेगारांना अभय दिले जाते, अशा आरोपांची सरबत्ती कोल्हे यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार प्रकाश गजभिये यांनीही भाजप नेत्यांना लक्ष्य केले.

सभांना शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रवीण कुंटे, दिलीप पनकुले, माजी आमदार दीनानाथ पडोळे, राजू नागुलकर, वेदप्रकाश आर्य, बजरंगसिंग परिहार आदी उपस्थित होते.

Latest बातम्या