

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. हा बंद निषेधार्थ नव्हता. तर एक टेस्ट केस होती. पण त्याचं गांभीर्य लोकांना समजलेलं नाही. लोकांनी अजूनही ऐकलं नाही, तर सरकारला यापेक्षा कठोर पावलं उचलावी लागतील.
जनता कर्फ्युच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसत होती. बाहेर पडू नका.उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलणं झालं आहे. त्यांना काही गोष्टी सूचवल्या आहेत. यावर काम सुरू आहे, असं त्यांनी मला सांगितलंय.लोकांना परिस्थितीचं गांभीर्य कळत नसेल, तर कठोर पावलं उचलण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. आज जे लोक घराबाहेर निघत आहे, गाडी घेऊन फिरत आहेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, ही बाब सहज घेऊ नका.




आमचे चॅनल subscribe करा
