फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजजे नाही बोलत त्यांच्यापासून ‘संविधान’ वाचवणे गरजेचे..

जे नाही बोलत त्यांच्यापासून ‘संविधान’ वाचवणे गरजेचे..

Advertisements


श्‍याम मानव यांच्या वादग्रस्त भाषणात भाजप युवा मोर्चाचा गोंधळ

नुसते आरोप करुन मानव कोणता ‘बदल’घडवतात आहेत?नेटकरींचा सवाल

अंधश्रद्धा निर्मूलनाचे चांगले काम मात्र,आता डोळ्यांवर राजकीय पट्टी:नेटक-यांचा आरोप

नागपूर,ता.१६ ऑक्टोबर २०२४: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्‍याम मानव यांचे आज नागपूरातील सुरेश भट सभागृहात ’संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ’या शीर्षकाखाली भाषण सुरु होते,मूळात संविधान आणि महाराष्ट्राच्या निवडणूकींचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नसून,लोकसभेत ‘संविधान बचाओ,देश बचाओ’च्या चळवळीतून मिळालेले यश व त्यामुळे अंगावर मूठभर मांस चढल्याने, त्याच निवडणूक निकालांच्या पुनरावृत्तीचे ध्येय महाराष्ट्राच्या विधान सभेच्या निवडणूकीत साधण्यास सज्ज झालेले श्‍याम मानव हे उघडपणे महाविकासआघाडीचा विजय व महायुतीच्या पराभवासाठी ‘वैचारिक’मोहिम चालवित आहेत,हे कोणापासून ही लपलं नाही,त्यांनीही कधी लपवलं नाही मात्र,ज्या ‘संविधानाची’दुहाई देत ते हा जागर संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहेत त्या संविधानाविषयीच ते बोलत नाहीत,सांगतात तो फक्त पुरावे न देता इतिहास, खरं तर त्यांच्यापासूनच संविधानाला वाचवणे गरजेचे आहे,असे आता म्हटले जात आहे.

श्‍याम मानव यांच्या प्रत्येक भाषणात ते ‘शुद्र श्‍याम मानव’ असल्याची सर्वात आधी तर जाणीव करुन देत असतात,जेणेकरुन सभागृहातील उपस्थितांना त्यांची ‘जात’कळावी व त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण व्हावी,पुढे त्यांच्या भाषणातील सर्व ‘ऐतिहासिक’ किंबहूना ’काल्पनिक’संदर्भांना उपस्थितांची मूक संमती मिळावी,हा त्यांचा हेतू असावा.टिळकांच्या संदर्भातील त्यांची अत्यंत कडवट मते आणि उदाहरणेे,याचे कोणतेही दाखले किवा पुरावे ते सादर करीत नाहीत.त्यामुळे टिळकांची नुसती बदनामी करण्याचा हेतू असतो,अशी टिका समाज माध्यमात वाचायला मिळते.मनुस्मृति,सवर्णांचे स्तोम,संघ,शिवरायांनाही टिळकांनी जातीने शुद्र समजणे,गागाभट्टांचे उदाहरण,छत्रपतींचा राज्याभिषेक आणि वैदिक मंत्रोपचार ऐकण्याची छत्रपतींना आज्ञा नसणे,असे अनेक उदाहरण ते आपल्या प्रत्येक भाषणात गेल्या दशकभरापासून देत असतात मात्र,९०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचे कोणतेही दाखले ,संदर्भ किवा पुरावे ते आपल्या भाषणात देत नाहीत,हे त्यांचे चातुर्य!

त्यामुळे आपल्या भाषणातून त्यांना महापुरुषांचा आधार घेऊन केवळ सवर्णांवर आघात करने व निवडणूकींच्या तोंडावर आपली राजकीय पोळी शेकणे वरुन ‘संविधान बचाओ’चे त्या नुसती बदनामी करणा-या कार्यक्रमांना स्लोगन देणे,एवढंच कार्य श्‍याम मानवांचे राहीले आहे का?असा प्रश्‍न त्यांना विचारला जात आहे.

महत्वाचे म्हणजे ज्या काळाचे ते उदाहरणे देतात तो काळ आज राहीला आहे का?त्या काळी ज्यांना ‘शुद्र’म्हणून हिणवलं त्यांनी मनावर घेतलं त्यामुळेच देशाच्या आज किती आयआयटी शिक्षण संस्थांमध्ये हीच शुद्रांची मुले हिरिरीने शिकताना दिसून पडतेय,हे श्‍याम मानवांना दिसत नाही का?हा त्यांच्या कर्तृत्वाचा,उपजत बुद्धिमत्तेचा आणि जातीचाही अपमान नाही का?हजारो वर्षां पूर्वीच्या भूतकाळात त्यांना गुंतवायचे की संविधानाचा जागर करुन त्यांचा भविष्यकाळ सुखी करायचा?हे श्‍याम मानव यांना आता ठरवावे लागणार आहे.

अंधश्रद्धा निमूर्लनाचे अतिशय चांगले सामाजिक कार्य करणारे श्‍याम मानव यांनी आता स्वत: डोळ्यांवर ‘जातीवादाची’पट्टी लावली आहे का?अशी शंका येते.जे संविधानाची सर्रास पायमल्ली करतात आहेत आणि जे संविधानाची दुहाई देत जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम व्यासपीठांवरुन करीत आहे,त्यांच्यात आणि श्‍याम मानव यांच्यात काय फरक आहे?असा सरळ सवाल श्‍याम मानव यांना विचारला जात आहे.आता लोकं फार कंटाळली आहे या सर्व प्रकारांना,त्यांचे जीवन-मरणाचे,आनंद सुख-दुखाचे प्रश्‍न फार वेगळे आहेत.त्यावर श्‍याम मानव यांनी संविधानाचा आधार घेऊन दिशा दाखवावी,असा देखील सल्ला त्यांना दिला गेला.माणूस हा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करुन जुळत नाही तर मुद्दांनी जुळत असतो.आज डिजिटल मिडीयाच्या काळात तर अफाट वेग वाढला आहे विचारांचा,संधीचा,समाजातील,राज्यातील,देशातील प्रश्‍न काय आहेत?संविधानानुसार ते सोडवले जात आहेत का?भ्रष्टाचार,बेरोजगारी,महागाई,मूलभूत सोयी सुविधांनाही वंचित असणारे भारताचे नागरिक,आरोग्य,शिक्षण हे विषय संविधानात येत नाहीत का?की फक्त ‘जात’येते?

श्‍याम मानव यांना अनेकदा ते फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धेविषयीच का बोलतात?असा प्रश्‍न विचारला गेला,यावर ‘मी आधी माझे घर स्वच्छ करतोय’असे मोघम उत्तर देऊन ते गप्प बसतात.इतर ही धर्मात अनेक अंधश्रद्धा आहेत मात्र,त्यावर श्‍याम मानव हे बोलत नाहीत.मात्र,ज्या संविधानाच्या बचावासाठी ते बोलतात,तोच संविधान उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील अवघ्या २२ वर्षीय रामगोपाल यादव याला जगण्याचा अधिकार देत होता ना?दूर्गोत्सवात देवीच्या विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम बहूल भागातून मिरवणूक नेण्यात आली,जी सहज टाळता आली असती.मात्र,आमच्या भागातून माेहरमचा मातम रात्रभर केला जातो त्यामुळे त्यांच्या भागातून देवीची मिरवणूक काढली जाईल,हा अट्टहास अनाठायी होता.यानंतर मिरवणूकीत वाजवले जाणारे गाणे हे देखील भावना भडकवणारे होते,यात ही वाद नाही,यानंतर झालेली दगडफेक,मूर्तीची विटंबना,रामगोपाल याने एका घराच्या छतावर चढून हिरवा झेंडा खाली उतरवून त्या ठिकाणी भगवा लावणे,या घटना भारता सारख्या देशात घडतात,खरे तर हेच संविधाना समारे सर्वात मोठे आव्हान आहे.

यानंतर रामगोपाल याचे तात्काल काही मूले अपहरण करतात,त्याच्या हाता-पायांची नखे उखडली जातात,३६ छर्रे त्याच्या शरीरात सापडतात,यानंतर त्याला वीजेचा करंट देऊन ठार मारले जाते,घरी चारच महीन्यां पूर्वी लग्न झालेली त्याची २० वर्षीय पत्नी, तो मिरवणूकीनंतर घरी आल्यावर जेवण करु,म्हणून वाट बघत असते.श्‍याम मानव हे ज्या संविधानाची दूहाई देत राज्यभर फिरतात,त्या संविधानानुसार रामगोपाल या अवघ्या २२ वर्षीय र्निबुद्ध मुलाला पकडून पोलिसांकडे देता आले नसते का?त्याला कायद्याने शिक्षा झाली नसती का?हिरवा झेंडा खाली उतरवून भगवा झेंडा लावण्याची शिक्षा अतिशय क्रूरपणे ठार करणे,हा अधिकार देशाचा संविधान देतो का?मग श्‍याम मानव हे कोणत्या संविधानाच्या बचावासाठी राज्यभर जागर करीत आहेत?यात देशातील विविध भागात घडलेल्या इतर मॉब लिंचिंगची उदाहरणे देखील आली,ज्याचे समर्थन कोणीही करणार नाही.
यावर ते काहीच बोलत नाही मात्र,हे ही नसे थोडके,आपल्या भाषणात ते गडकरी,फडणवीस यांच्या पत्नींचा उल्लेख करतात.ब्राम्हणांच्या मुलींना प्रेम विवाह करता आले नसते,संविधान नसते तर गडकरी हे रिक्क्षा चालक असते,फडणवीस हे चहा टपरी चालवित असते,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा अर्थ इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे,असा होत नाही,हे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमधून स्पष्ट केले आहे.स्वाभाविक आहे,मोदी,गडकरी,फडणवीस यांचा व त्यांच्या पत्नींचा उल्लेख अशा खालच्या स्तरावर जाऊन केल्यास मंचावर येऊन भाजपचा युवा मोर्चा गोंधळ घालणारच आणि नागपूरात त्यांनी तो गोंधळ घातलाच.पोलिसांनी त्यांना जबरीने सभागृहा बाहेर काढले.यानंतर ही श्‍याम मानव यांनी आपले भाषण पूर्ण केले,असा बडेजाव आणने ,अहंकाराशिवाय याला दूसरा शब्द नाही.

कालच मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी ‘निर्भय बनो’चळवळीचे प्रणेते विश्‍वंभर चौधरी व ॲड.असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.आचार संहिता लागण्या पूर्वी अवघ्या काही तासांच्या आत सात सदस्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची राज्यापालांकरवी शपथ देण्यात आली,मात्र,माजी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी आघाडी सरकारने पाठवलेली १२ नावे ही अडीच वर्षे रोखून धरली होती,ही होती संविधानाची पायमल्ली,ती देखील राज्यपाल पदावरील संवैधानिक व्यक्तिकडून!विश्‍वं्भर चौधरी आणि असीम सरोदे संपूर्ण राज्यात संविधानाच्या या पायमल्लीचा जागर करीत फिरत आहेत,श्‍याम मानव मात्र,अद्याप ही शुद्र-सवर्ण हा जातीयवाद, संविधानाच्या नावाखाली राज्यभर पेरत आहेत.त्यांचा हेतू संविधान वाचवण्यापेक्षा पुन्हा एकदा ‘जातीयवादाचा मत्सर’पेरण्याचा दिसून पडतो,असा सरळ आरोप त्यांच्यावर केला जातो.

नागपूरातच येणा-या महानगरपालिकेची निवडणूक सर्वच जाती-धर्माचे नव्या दमाचे सुशिक्षीत तरुण मिळून लढण्याची एक बैठक आज पार पडली.भ्रष्टाचाराने बरबटलेल्या,किडलेल्या,सडलेल्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेला बदलण्यासाठी त्या तरुणांचे प्रयत्न याचे कौतूक व्हायला हवे.माहितीच्या अधिकारात महायुती सरकारने केवळ जाहीरातींवरच २०० कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे.हा कोट्यावधीचा खर्च योजनांच्या जाहीरातींपेक्षा प्रत्यक्ष योजनांवर केला असता तर आज भारताचे आणि महाराष्ट्राचे दृष्य वेगळे राहीले असते.बदल जेव्हाच घडेल जेव्हा सामान्य माणूस जागा होतो,श्‍याम मानव हे सामान्य माणसाला,आजच्या परिपेक्षात जागे करण्या ऐवजी भूतकाळातील घटनांमध्ये अडकवू पहात आहेत.संविधानाने दिलेले स्वातंत्र्य,अधिकार यांचा उल्लेख करताना त्यांना तरी त्यांच्या पत्नी विषयी बोललेले आवडेल का?हा साधा प्रश्‍न आहे.

अंधश्रद्धेसाठी श्‍याम मानव यांनी केलेले काम हे स्तुत्य आहे.यासाठी ते कायम श्रद्धेय ठरतील मात्र,महायुतीच्या परावभासाठी व महाविकासआघाडीच्या विजयासाठी त्यांनी संविधाना ऐवजी ‘निर्भय बनो’यासारख्या चळवळीचा आधार घेणे क्रमप्राप्त आहे,असाच सूर समाज माध्यमांवर भट सभागृहातील घटनेनंतर उमटला.
…………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या