

ज्येष्ठ स्वयंसेवक मा.गो.वैद्य यांचे निधन
नागपूर,ता. १९ डिसेंबर: मा.गो. वैद्य उपाख्य बाबूरावजी वैध यांच्यासोबत माझे व माझ्या कुटंबियांचे कौटूंबिक संबंध होते.ते एक ज्येष्ठ,कर्मठ व समर्पित स्वयंसेवक होते.संघ विचारांचे आपल्या जीवनात शतप्रतिशत अनुकरण त्यांनी अंगिकारले.कर्तुत्व व असामान्य बुद्धिमत्ता व प्रखर पत्रकार ही त्यांची ताकद होती.पत्रकाराच्या रुपात त्यांनी जे ‘भाष्य‘ तसेच लेख लिहले ते अत्यंत विचारप्रर्वतक व प्रेरणास्त्रोत आहेत. त्या लेखातून संघ विचारांची प्रेरणा आम्हाला मिळत होती.ती प्रेरणा देणारा एक अलौकिक बुद्धिमत्तेचा स्त्रोत आज हरपला.एक खरा मार्गदर्शक हरपला. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो,अशा शब्दात भावपूर्ण उद् गार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मा.गो.वैद्य यांच्या निधनावर व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत पत्रकार,हिंदूत्वाचे भाष्यकार,तरुण भारतचे माजी मुख्य संपादक,रा.स्व.संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैध यांचे आज शनिवार,दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता निधन झाले. ते ९७ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा,तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ.प्रतिभा उदय राजहंस,भारती जयंत कडू तसेच पाच मुले धनंजय,डॉ मनमोहन (सहकार्यवाह,रा.स्व.संघ)श्रीनिवास,शशिभूषण व डॉ.राम(हिंदू स्वयंसेवक संघ,सह संयोज व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या देहवसनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.याप्रसंगी गडकरी यांनी ट्वीट करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक,ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा.गो.वैद्य यांना विनम्र श्रद्धाजंली वाहत पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे,त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले असल्याचे सांगितले.विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारर्कीद सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील.माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे.मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आर्शिवाद मिळाले आहेत. खरे तर बाबूूरावजी शतायुषी होतील,हा ठाम विश्वास होता,परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.एक व्रतस्थ आणि ऋषिमूल्य व्यक्तिमत्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे.ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो,अशी श्रद्धांजली ट्विटवर वाहीली.
अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या राहत्या घरी ८०,विद्याविहार,प्रतापनगर,नागपूर-२२ येथून निघेल व अंबाघरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.
ज्ञानसागर, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले! फडणवीस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ चिंतक, ज्येष्ठ संपादक-विचारवंत श्री मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला आम्ही सारे मुकलो आहोत. बाबुराव शतायुषी होतील, ही खात्री होती. पण, काळाने त्यांना आमच्यातून हिरावून घेतले. त्यांच्या जाण्याने ज्ञानसागर, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान, कोणताही किचकट विषय सहजसोपा करून सांगण्याचे कसब, मराठी भाषा आणि व्याकरणावरील सिद्धहस्त लेखक अशी कितीतरी बिरूदं अपुरी पडतील, इतकं अथांग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन पाहत असे. केवळ संघसेवा नव्हे तर संघविचार रूजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यासाठी हालअपेष्टाही सहन केल्या, अशा मा. गो. वैद्य यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून न निघणारीच अशीच आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
देशासाठी आपले सर्वस्वपणाला लावणारे जेष्ठ विचारवंत हरपले:-आ.चंद्रकांत(दादा) पाटील [प्रदेशाध्यक्ष-भारतीय जनता पार्टी ]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक मा.गो.वैद्य यांच्या निधनामुळे देशेसेवेसाठी संघर्ष करणारे झंझावाती वादळ शांत झाल्याची शोकभावना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत(दादा) पाटील यांनी यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक,शिक्षक,पत्रकार,विधान परिषद सदस्य असा दांडगा अनुभव मा.गो.वैद्य यांच्या पाठीशी होता. राजकीय जबाबदारी असो वा संघाचे काम , मा गो वैद्य यांनी प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडली. देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावणे ही संघाची शिकवण त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे अंगिकारली होती. अशा या महान विचारवंतांच्या जाण्याने समाजात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांची उणीव नेहमी भासत राहील अशी खंत देखील आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
हमने एक ज्येष्ठ मार्गदर्शक खो दिया है:आमदार गिरीश व्यास
श्री. बाबुराव उपाख्य मा.गो. वैद्य जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के बालपन से स्वयंसेवक थे, प्रचारक के नाते उन्होंने संघ का विस्तार किया पुरा परिवार संघ संस्कारों से सिंचित है तथा समर्पित हैं। उन्होंने संघ के सुचनानुसार भारतीय जनसंघ का भी विस्तार नागपूर, विदर्भ एवं महाराष्ट्र में किया।तरूण भारत के संपादक के रूप में उनके लेख समान जो रचा चेतना देने में परिपूर्ण थे। वे मराठी भाषा व्याकरण के चिंतक, ग्रंथ संपदा के धनी रहेे। संघ के इतिहास में वर्तमान के साक्षी थे। वे विधान परिषद के सदस्य भी थे। उनके सभागृह में भाषण आज भी सार गर्भीत है। उनके निधन से हमने एक ज्येष्ठ मार्गदर्शक खो दिया है, विनम्र श्रद्धांजली।




आमचे चॅनल subscribe करा
