

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे:
>> सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कापलेलं नाही. गैरसमज करून घेऊ नका.
>> आर्थिक घडी बसवण्यासाठी आपण ही मांडणी करत आहोत. वेतन टप्प्याटप्प्यात देण्यात येणार आहे.
>> परदेशातून आलेल्या व्यक्तींनी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
>> खासगी दवाखाने डॉक्टरांनी बंद ठेवले आहेत. आता तुमची खरी गरज आहे. त्यामुळं दवाखाने खुले ठेवा.
>> सर्दी, खोकल्याव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करा. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळले तर त्यांना सरकारी दवाखान्यात पाठवा.
>> मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये. आहात तिथेच थांबावे. निवास आणि जेवणाची व्यवस्था केली आहे.
>> जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळं स्थलांतर करण्याची गरज नाही.
>> मजूर आणि कामगारांसाठी जवळपास हजार केंद्रे सुरू केली आहेत. दोन-सव्वा दोन लाख मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
>> अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार.
>> एकच मंत्र, अनावश्यक गर्दी करायची नाही.
>> हे संकट आहे, हे युद्ध आहे, या युद्धामध्ये आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच!
>> मेडिकल, फार्मसी, दिवसरात्र काम करणारे एसटी, बेस्ट कर्मचारी आहेत, सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आपण सगळे २४ तास घरी जरी असलो तरी ही सगळी लोकं २४ तास आपल्यासाठी रस्त्यावर आहेत.
>> जीवनावश्यक वस्तूंचा साठा, अन्नधान्याचा साठा आपल्याकडे पुरेसा आहे, मुबलक आहे. त्याच्यात कुठेही टंचाई होणार नाही, होऊ देणार नाही.




आमचे चॅनल subscribe करा
