फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआता विद्यार्थीगृहामध्ये ही भ्रष्टाचार!

आता विद्यार्थीगृहामध्ये ही भ्रष्टाचार!

Advertisements

१५ जूनच्या निवडणूकीत पॅनलच बदलण्याचे शेखर सावरबांधे यांचे आवाहन

जवाहर विद्यार्थी गृहाच्या विद्यमान पॅनलवर केले गंभीर आरोप

दहा वर्षांपासून संस्थेची निवडणूकच नाही:धर्मादाय आयुक्तांचे १५ जून रोजी निवडणूक घेण्याचे आदेश

नागपूर,ता.३१ मे २०२५: सिव्हिल लाईन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह ही नागपूरातील एक नामवंत संस्था असून २०१५ पासून या संस्थेची निवडणूकच झाली नाही!परिणामी,धर्मादाय आयुक्तांनी १५ जून २०२५ रोजी जवाहर विद्यार्थी गृहाच्या सभागृहात निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे.गेल्या ३३ वर्षांपासून विद्यमान अध्यक्ष रमेश गिरडे व पॅनलवरील इतर सभासदांवर माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे.

गिरडे यांची संस्थेत एकाधिकारशाही चालत असून नवीन सभासद बनण्यापासून लोकांना ते वंचित ठेवत आहेत.इतकंच नव्हे तर फक्त आपल्या नातेवाईकांना सभासद करुन घेत वारंवार सत्ता काबिज करीत असल्याचा आरोप सावरबांधे यांनी केला.

धर्मादाय आयुक्तांनी २०१५ नंतर मागच्या दाराने सभासद झालेल्यांना या निवडणूकीत मतदान करण्यास बंदी घातली असल्याचे त्यांनी सांगितले.या निवडणूकीत विद्यमान पॅनल विरुद्ध ‘संताजी विकास पॅनल’ने दंड थाेपटले असल्याची माहिती त्यांनी दिली.या निवडणूकीत ते संताजी विकास पॅनलतर्फे अध्यक्ष पदाची निवडणूक लढत असून, नितीन कुंभलकर,धर्मराज रेवतकर,अॅड.जगदीश गायधने,नाना ढगे,डॉ.यशवंत खोब्रागडे,ॲड.पुरुषोत्तम घाटोळे हे पॅनलचे मार्गदर्शन करीत आहेत.

गिरडे यांच्यासह पॅनलवरील सभासदांवर न्यायालयाच्या आदेशानुसार भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले असून, त्यांना अटक होण्याची शक्यता ही नाकारात येत नाही,असे ते म्हणाले.एक सभासद कार्यकारीणीमध्ये एका पदावर जास्तीत जास्त दोनच वेळा निवडणूक लढू शकेल अशी व्यवस्था असणारी घटना दुरुस्ती करणार असल्याचे सावरबांधे यांनी सांगितले.

३३ वर्षांपासून एकच एक कार्यकारणी असल्यामुळे कमकुवत झालेली कार्यक्षमता,आर्थिक प्रशासकीय अनियमितता,हूकूशाही वृत्ती तसेच बोकाळलेला आर्थिक भ्रष्टाचार यावर सावरबांधे यांनी बोट ठेवले.जवाहर विद्यार्थी गृहाचा विकास पूर्णपणे ठप्प झाला असून मतदारांनी आम्हाला कल दिल्यास या वसतीगृहाचा चेहरा-मोहर बदलवून टाकू,असे आश्‍वासन त्यांनी दिले.

मी व रमेश गिरडे हे दोघेही काँग्रेसी आहोत मात्र,ही समाजाची निवडणूक असून यात राजकारणाचा संबंध नाही असे सावरबांधे म्हणाले.आमच्या पॅनलमध्ये सगळे उच्च विद्याभूषित असून ते वेगवेगळ्या व प्रतिष्ठित कुटूंबातील असून त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आपापली प्रतिभा सिद्ध केली आहे.महत्वाचे म्हणजे आमच्या ‘संताजी विकास पॅनल’मध्ये कोणीही कोणाचा नातेवाईक नसल्याचे त्यांनी सांगितले.विद्यमान अध्यक्ष गिरडे यांनी लाखो समाजबांधवाना सभासद होण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला.

याप्रसंगी त्यांनी गिरडे व त्यांच्या पॅनलवर अकार्यक्षमता,आर्थिक भ्रष्टाचार,अनियमिततेचे आरोप करीत, सुराबर्डी येथील जागा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले.यावर कायदेशीर कारवाई होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय दंडविधानाच्या कलम ४२०,४६४,४६८ व ३४ अन्वये विद्यमान अध्यक्ष रमेश गिरडे,गुलाब जुननकर,शंकरराव भुते,मिलिंद माकडे,चंद्रकांत ढोबळे व प्रमोद महाजन यांच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याचे सांगितले.

अनेक चांगले विकल्प उपलब्ध असताना बुटीबोरी येथे भुखंड घेण्यात आला यामध्ये देखील पारदर्शी व्यवहार करण्यात आला नाही.तसेच कुठलेही विकास कामाचा आराखडा नसताना १८ लक्ष रुपये विद्युत ट्रान्सफॉमर काही वर्षां आंधी लावण्यात आले ज्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप याप्रसंगी सावरबांधे यांनी केला. विद्यमान अध्यक्ष व त्यांच्या पॅनलने संस्थेचे पैसे मृत गुंतवणुकीत टाकले असून यामुळे संस्थेचा कोणताही फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले.

संस्थेची दर तीन वर्षांनी निवडणूक होणे अपेक्षीत असते.परंतू २०१५ पासून संस्थेची निवडणूकच झाली नाही.प्रत्येक वेळी नवीन निवडून आलेल्या पदाधिका-यांची धर्मदाय आयुक्तकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे,ज्याला ‘चेंज रिपोर्ट’म्हणतात.परंतु सध्याच्या पदाधिका-यांनी गेल्या २७ वर्षांपासून हा चेंज रिपोर्टच सादर करुन मंजूर करुन घेतला नाही.त्यामुळे १९९८ साली जे पदाधिकारी होते त्यांचीच नावे रेकॉर्डवर आहे.ज्यामध्ये अजुनही ॲड.आनंदराव गिरडकर व विजया बालपांडे यांचा समावेश आहे.म्हणजे १९९८ नंतर जे पदाधिकारी निवडून आले त्यांनी केलेला कारभार हा कायदेशीररित्या बेकायदेशीर ठरतो,असे सावरबांधे म्हणाले.
इंदिरा कॉन्वेंटला भाड्याने दिलेल्या जागेबद्दल विद्यमान अध्यक्षाने मागील २९ वर्षे आमसभेत खोटे सांगितले व सभासद व समाजबांधवांची दिशाभूल केल्याचा आरोप सावरबांधे यांनी केला.या बाबत न्यायालयात खटला सुरु असून चार वर्षांपूर्वी संस्थेने खटला टाकला असून अध्यक्षांच्या भूमिकेबद्दल शंका निर्माण होते.काही वर्षांपूर्वी संस्थेने वैकुंठ वाहिका(शववाहिका) घेतली मात्र,मागील ४ ते ५ वर्षांपासून ती बंद आहे.समाजातील एका दानदात्याने संस्थेला ती शहवाहिका दिली होती,जी संस्थेच्या कोणत्या तरी गोदामात बंद पडून आहे.याचा अर्थ संस्थेतील विद्यमान सभासदांना समाज भावना व सामाजिक बांधिलकीशी काहीही घेणे-देणे नाही,असा त्याचा अर्थ होतो.
सिव्हिल लाईन्स येथील दक्षीणेकडील ४००० चौ.फुट जागा विद्यमान अध्यक्षांच्या अकार्यक्षमतेमुळे संस्थेने गमावली असून नंदनवन येथील विद्यार्थी वसतीगृह गेल्या ३३ वर्षांपासून ते सुरु करु शकले नाहीत,असा आरोप सावरबांधे यांनी केला.विद्यमान अध्यक्षांचा नंदनवन येथील वास्तूबाबतचा दृष्टिकोण उदासिन असल्याने तेथील विकासकामे होऊ शकली नाही.परिणामी,संस्थेच्या उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नाही.याशिवाय त्यांच्या अश्‍या उदासिन धोरणामुळेच संस्थेच्या पूर्व,दक्षीण तसेच मध्य नागपूरातील सभासदांना व समाज बांधवांना नंदनवन येथील वास्तूचा लाभ घेता आला नाही.याशिवाय ज्या उद्देशाने नंदनवनचा भूखंड संस्थेला मिळाला आहे,त्याचा कुठलाही उपयोग न केल्यास केव्हाही कायदेशीर कारवाई होऊ शकते,असे ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे अंतर्गत लेखा परिक्षकाची हेतुपुरस्सर नेमणूक करण्यात आली नाही.जागरुक कार्यकारी सदस्यांनी नियमबाह्य केलेल्या खर्चाला आक्षेप घेऊनसुद्धा बहूमताच्या जोरावर खर्चाला मंजुरी देण्यात आली यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले.
संताजी पॅनलच्या ‘उगवता सूर्य ’ या बोधचिन्हावर रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ८ ते ५ दरम्यान जवाहर विद्यार्थी गृहाच्या सभागृहात पार पडणा-या मतदानाच्या दिवशी शिक्का मारुन प्रचंड बहुमताने सर्व सभासदांना विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी शेखर सावरबांधे यांनी केले.

याप्रसंगी संताजी विकास पॅनलचे ११ सदस्य उपाध्यक्ष दिवटे नरेंद्र कुमार,मुख्यकार्यवाह काचाेरे गंगाधर यशंवतराव,सहकार्यवाह बेले हर्षवर्धन गोविंदराव,कोषाध्यक्ष टापरे बालानंद पुंडलिकराव,कार्यकारणी सदस्य अंबागडे प्रविण गोविंदराज,बडवाईक प्रज्ञा इंद्रकुमार,भुरे लोकनाथ गंगाराम,दांडेकर हरिष विठ्ठलराव,घुगुसकर कृष्णा देवराव,जयपुरकर हरिश पुंडलिकराव,मोटघरे विजय(बंडू)चिंतामण,पिसे रमेश कुष्णराव,सारखरकर अनिल वासुदेवराव,सुरकर केशवानंद रामचंद्र,तिळगुळे प्रकाश भैय्याजी,उराडे रवि दशरथ,वैद्य शामराव दयाराम तसेच वंजारी सुखदेव चांगदेव उपस्थित होते.
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या